Tanaji Dharne

आंबळे येथील तानाजी धरणे यांचे ‘हेलपाटा’ कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर…

शिरूर तालुका

शिरूरः शिरूर तालुक्यातील आंबळे गावचे सुपुत्र आणि रायगड जिल्ह्यात ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले तानाजी धरणे यांची हेलपाटा ही कांदबरी प्रकाशित होत आहे. त्यानिमित्ताने…

तानाजी धरणे हे आमच्या गावात जन्माला आलेलं आणि तावून सुलखून निघालेलं बावनकशी सोनं आहे. आत्तापर्यंतचा त्यांचा साहित्य क्षेत्रातील प्रवास सृजनशील कवी/गीतकार म्हणून पाहिला आहे. त्यांचे काही कविता संग्रह प्रकाशित झाले आहेत तर काही प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांच्या कवितांनी रसिक वाचकांच्या मनात एक आगळं वेगळं गारुड निर्माण केलं आहे.

परंतु आज त्यांची हेलपटा ही अस्सल ग्रामीण मराठी कादंबरी (आत्मकथन) वाचल्यानंतर माझ्यासहित प्रत्येक वाचकांचे मन भूतकाळात रमाल्याशिवाय राहत नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये खूप सारे भलेभुरे अनुभव येत असतात.हे स्वानुभव व्यक्त करण्याचे अनेक प्रकार आहेत.त्यामध्ये लेखक तानाजी धरणे यांनी लेखनीचा वापर केला. स्वतः लेखक आणि त्यांच्या परिवाराने पोटाचं खळग भरण्यासाठी उपासलेले कष्ट वाचून नकळत डोळ्याची कड आपोआपच ओली होते आणि लेखक प्र. ई. सोनकांबळे सरांच्या आठवणीचे पक्षी या आत्मकथनाची आठवण येते.

एकेकाळी ओसाड माळरान असलेल्या आनोसेवाडीच्या भूमिमध्ये जन्माला आलेलं हे रत्न साहित्य निर्मिती मध्ये हरवून गेलं आहे.साहित्य निर्मितीची आवड असल्यामुळे ग्रामविकास अधिकारी म्हणून कार्यरत असतानाही आपल्या कर्तव्याचे जाणीव ठेवून साहित्य निर्मितीसाठी एक छंद म्हणून वेळ देत आहे. त्यांच्या साहित्या निर्मितीला कोकणातील महाडच्या भूमीचा सोनपरीस लाभल्यामुळे त्यांची लेखनशैली बहरात गेली व त्यातूनच हेलपटा ही अस्सल ग्रामीण बाज असणारी कादंबरी निर्माण झाली. लेखक तानाजी धरणे यांच्या या कादंबरीचे वाचन करत असताना ज्या रसिक वाचकांनाही बालपणी परिस्थितीचे चटके सोसले त्यांना त्या चांगल्या वाईट प्रसंगाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही असे मला तरी वाटते. असो.

आमचे ग्रामवासी मित्र तानाजी धरणे यांच्या साहित्य क्षेत्रातील गरुडभरारीला आनोसेवाडी, आंबळे ग्रामवासियांच्या वतीने तसेच पुणे जिल्ह्यात शिक्षणाची ज्ञानगंगा खेडोपाडी पोहोचवणारे कै. बाबुराव रामचंद्र घोलप साहेब यांनी स्थापन केलेल्या श्री भैरवनाथ माध्य. व उच्च माध्य. विद्यालय करडे या विद्यालयातील सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.

– श्री. विष्णू संकपाळ सर
सेवानिवृत्त अध्यापक.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे.