नरसापूरमध्ये चिमुरडीवरील अत्याचारानंतर संताप; आरोपीस कठोर शिक्षेची मागणी

  भोर: भोर तालुक्यातील नरसापूर येथे एका चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून आरोपीला तातडीने अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित चिमुरडी बेपत्ता झाल्यानंतर तिचा शोध सुरू होता. त्यानंतर तिचा मृतदेह आढळून […]

अधिक वाचा..

जांबुत ग्रामपंचायतीत सरपंचाविरोधात अविश्वास ठरावाची मागणी; आठ सदस्यांचा तहसीलदारांकडे अर्ज

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील जांबुत ग्रामपंचायतीचे सरपंच दत्तात्रय रामचंद्र जोरी यांच्याविरोधात ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वास ठराव मंजूर करण्याची मागणी करत तहसीलदारांकडे अधिकृत अर्ज सादर केला आहे. या घडामोडीमुळे स्थानिक राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२२ मध्ये पार पडली असून, ३० ऑगस्ट २०२२ पासून दत्तात्रय जोरी हे सरपंच म्हणून कार्यरत […]

अधिक वाचा..

आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी; विजय वडेट्टीवार यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

नागपूर: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी सत्ताधारी पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांच्या कथित धमकीप्रकरणी कठोर कारवाईची मागणी केली आहे. ‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रकाश आंबी यांना दिलेली जीवे मारण्याची धमकी ही अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर थेट आघात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात वडेट्टीवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आमदार गायकवाड […]

अधिक वाचा..

मुंबईत वाढत्या ड्रग्ज व्यापारावर कारवाईची मागणी; ‘ड्रगमुक्त मुंबई’ अभियान राबविण्याचा आग्रह

मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते तथा युवक मुंबई अध्यक्ष ॲड. अमोल मातेले यांनी गृहराज्यमंत्री मा. ना. योगेश कदम यांची मंत्रालयात भेट घेऊन सविस्तर निवेदन सादर केले. मुंबईतील महाविद्यालयीन युवकांना लक्ष्य करून वाढत असलेल्या नशेखोरीच्या घटनांबाबत त्यांनी गंभीर चिंता व्यक्त केली. गोरेगाव येथील नेस्को परिसरातील ड्रग्ज […]

अधिक वाचा..

परिवहन विभागात बदली-वसुली रॅकेटचा आरोप; निलंबित अधिकाऱ्यांचा सहभाग? चौकशीची मागणी

मुंबई: काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी परिवहन विभागातील कथित भ्रष्टाचार आणि छळवणुकीच्या गंभीर प्रकरणाचा पर्दाफाश करत मोठे आरोप केले आहेत. आरटीओ विभागातील बदल्या आणि बेकायदेशीर वसुलीसाठी मोठे रॅकेट सक्रिय असून, प्रामाणिक अधिकाऱ्यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवले जात असल्याचा दावा त्यांनी केला. वडेट्टीवार यांच्या मते, निवृत्त अधिकारी बजरंग खरमाटे हे या रॅकेटचे प्रमुख सूत्रधार असून, त्यांनी […]

अधिक वाचा..

महायुती सरकारवर नैतिकतेचा प्रश्न; झिरवाळांच्या VDO प्रकरणी तात्काळ कारवाईची मागणी

मुंबई: महायुती सरकारमधील कथित अनैतिक वादांमुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून, मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या आक्षेपार्ह व्हिडिओ प्रकरणावरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या प्रकरणी झिरवाळ यांची तात्काळ मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. सपकाळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोंदूबाबा अशोक खरात यांच्या कथित […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्री, उशीर झाला! नाशिक भोंदू बाबा प्रकरणात चौकशीची मागणी; महिला आयोगावरही प्रश्नचिन्ह

  नाशिक : राज्यात चैत्र नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर समोर आलेल्या कथित भोंदू बाबा प्रकरणामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. अंधश्रद्धा, महिलांचे कथित शोषण आणि त्याला मिळालेल्या संभाव्य राजकीय आश्रयामुळे राज्यातील वातावरण तापले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. नाशिकमध्ये अशोक खरात या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आल्याचा […]

अधिक वाचा..

पाबळ कान्हूर मेसाईत टँकरची मागणी

पाबळ (सुनील जिते): शिरूर तालुक्यातील पाबळ व कान्हूर मेसाई परिसरातील विहिरींनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गावाचा पाणीपुरवठा विस्कळित झाला असून, ग्रामस्थांना पाण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पाबळ व कान्हूर मेसाई ही गावे दुष्काळग्रस्त म्हणून ओळखली जातात. उन्हाळ्यात […]

अधिक वाचा..

IVF केंद्रांवर लगाम घालण्यासाठी जिल्हानिहाय समितीची मागणी; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे 

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेत महिलांच्या गर्भाशयातील बीजांड (ओव्हम/एग) बेकायदेशीरपणे काढून विक्री केल्या जाणाऱ्या गंभीर प्रकरणावर आज सविस्तर चर्चा झाली. विधान परिषद सदस्या चित्रा वाघ यांनी लक्षवेधी क्र. ८ अंतर्गत बदलापूर येथील घटनेचा संदर्भ देत हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला. चर्चेदरम्यान विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गृहराज्यमंत्री आणि आरोग्यमंत्री यांना महत्त्वपूर्ण सूचना केल्या. त्यांनी […]

अधिक वाचा..

नागपुरात ओबीसींचा एल्गार; जनगणनेत स्वतंत्र रकान्याची मागणी, स्फोटप्रकरणी कारवाईचा इशारा

नागपूर: केंद्र सरकारच्या सूचनेनुसार होत असलेल्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकाना नसल्याने समाजावर अन्याय होणार असल्याचा आरोप करत आज नागपूरच्या संविधान चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व विधानसभेतील काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केले. यावेळी बोलताना वडेट्टीवार म्हणाले की, देशातील जनगणना अर्जात ओबीसींचा स्वतंत्र उल्लेख नसल्यास समाजाचे मोठे नुकसान […]

अधिक वाचा..