एसटी महामंडळाच्या ‘राजमाता जिजाऊ’ बस सेवेचे भव्य लोकार्पण; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: महाराष्ट्राच्या समृद्ध परंपरेला आधुनिकतेची सुवर्ण किनार लाभली, तो क्षण आज विधानभवन प्रांगणात साकारला. ढोल-ताशांच्या गजरात, लेझीमच्या लयबद्ध तालावर आणि उत्साहाच्या उधाणलेल्या लाटांमध्ये ‘राजमाता जिजाऊ’ या अत्याधुनिक स्मार्ट बस सेवेचे भव्य लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते पार पडले. जणू इतिहास आणि वर्तमानाचा संगम घडवत, या सोहळ्याने सार्वजनिक परिवहनाच्या नव्या युगाची पहाट उजळवली. या दिमाखदार […]

अधिक वाचा..

डिसेंबर अखेर महामेट्रो मिरा -भाईंदर करांच्या सेवेत; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक 

मिरा रोड: तब्बल १४ वर्षाच्या संघर्षपूर्ण पाठपुरावाला यश येत असून सन २००९ मध्ये मिरा -भाईंदर वासियांना दाखवलेले स्वप्न पूर्णत्वास येत आहे. या डिसेंबर अखेर दहिसर ते काशिमिरा या मार्गावर मेट्रो सुरू करण्याचे नियोजन असून मिरा -भाईंदर वासियांसाठी हा एक आनंद क्षण असणार आहे. असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले. ते दहिसर ते काशिमिरा […]

अधिक वाचा..

पाणंद रस्ते, सर्वांसाठी घरे योजनांच्या अंमलबजावणीसाठी ‘सेवा पंधरवडा; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई: महसूल विभाग हा सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन गरजांसाठी कार्यरत विभाग आहे. यातील निवडक विषयांवर मोहीम स्वरुपात काम करुन नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी शासनाने 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ‘सेवा पंधरवडा’ राबविण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जन्मदिन 17 […]

अधिक वाचा..

भारतीय विदेश सेवेतील अधिकाऱ्यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट

पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई: भारताची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलर करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी महाराष्ट्राचे मोठे योगदान असणार आहे. अटल सेतू, कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग, मेट्रोचे जाळे यासारख्या महत्वपूर्ण पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावरच्या गतिमान असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे सांगितले. प्रशिक्षणाचा भाग म्हणून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या […]

अधिक वाचा..

पारगाव–पुणे एसटी सेवा पुन्हा सुरू; गणेगाव खालसा ग्रामस्थांकडून चालक–वाहकांचा सन्मान

शिरूर (ओमकार भोरडे): काही दिवसांपूर्वी थांबलेली पारगाव–मंगरूळ–जांबुत–मलठण–शिक्रापूर–वाघोली–पुणे ही एसटी सेवा पुन्हा सुरू करण्यात आली असून प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. शिरूर आगारातून धावणारी ही गाडी आता टपालसेवाही नेणार असल्याने ती “टपाल गाडी” म्हणूनही ओळखली जाणार आहे, अशी माहिती चालक गणेश पलांडे व वाहक दत्तात्रय डोळस यांनी दिली. या गाडीमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, नोकरी–धंद्यासाठी जाणाऱ्या कामगारांना तसेच […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीतील आरोग्य अधिकाऱ्यांची सेवा ‘रामभरोसे’;  ग्रामस्थांकडून बेजबाबदार वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या बदलीची मागणी

शिरूर (अरुणकुमार मोटे): टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून कामात दिरंगाई व कर्तव्यात हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांमधून होत असून आधिकारी निवासी राहत नसल्यामुळे ग्रामीण रुग्णालयात अधिकारी दाखवा आणि बक्षीस मिळवा अशी म्हणण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. डॉक्टर वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे रुग्णांची मोठी गैरसोय होत आहे त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची वरीष्ठ अधिकार्यांनी […]

अधिक वाचा..

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे व उपनिरीक्षक नकाते यांना नक्षलग्रस्त भागातील सेवेसाठी विशेष सेवा पदक

शिरूर (अरुणकुमार मोटे): शौर्य, निष्ठा आणि सेवाभाव यांचा उत्कृष्ट संगम घडवून आणत शिरूर पोलिस दलातील दोन अधिकाऱ्यांनी संपूर्ण शिरूर तालुक्याचा अभिमान वाढवला आहे. शिरूर पोलीस निरीक्षक संदेश केंजळे आणि पोलीस उपनिरीक्षक हनमंत नकाते यांना नक्षलग्रस्त भागात केलेल्या उल्लेखनीय, धाडसी व प्रामाणिक सेवेबद्दल विशेष सेवा पदक जाहीर झाले आहे. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी 2021 ते […]

अधिक वाचा..

मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून जीवनस्पर्श केंद्रात सेवाभावाने  उपचार करावेत

जीवनस्पर्श संयुक्त वैद्यकीय उपचारपद्धती केंद्राचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते उद्घाटन मुंबई:  मानवी सेवा हीच ईश्वर सेवा मानून अत्याधुनिक तंत्रज्ञान व तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून मानवी कर्तव्य समजून सेवाभावाने या केंद्रात उपचार करावेत.  समाजातील गरजू व आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या रुग्णांना वैद्यकीय मदत कशी देता येईल, याबाबत संवेदनशील दृष्टिकोन ठेवावा असे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले. गिरगाव परिसरातील […]

अधिक वाचा..

बोरीवली तहसिल मधील आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करा

एका दाखल्यासाठी विद्यार्थ्यांना मोजावे लागतात ३ ते ४ हजार रुपये आमदार अस्लम शेख यांचा आरोप मुंबई: बोरीवली तहसिल कार्यालयातील आपले सरकार केंद्र दिड महिना बंद राहणार आहे, अशी माहिती आपल्याला मिळाली असून हे केंद्र जर एवढ्या कालावधीसाठी बंद राहिलं तर गोरगरीब विद्यार्थ्यांनी जायचं कुठे असा सवाल विचारत हे आपले सरकार सेवा केंद्र तातडीने सुरु करावे, […]

अधिक वाचा..

आषाढी एकादशीला प्रवासी सेवेसाठी येणाऱ्या सर्व एसटी कर्मचाऱ्यांना मोफत भोजन व्यवस्था

मुंबई: आषाढी एकादशी निमित्त श्री. क्षेत्र पंढरपूर येथे विठुरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सेवेसाठी एसटीच्या ५२०० बसेसची व्यवस्था केली आहे. ह्या बसेस घेऊन येणारे चालक, वाहक त्यांची देखभाल करणारे यांत्रिक कर्मचारी व या सर्वांना मार्गदर्शन करणारे पर्यवेक्षक व अधिकारी यांच्या चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था मोफत करण्यात आली आहे. अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी […]

अधिक वाचा..