जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: खूप संघर्षानंतर तुम्ही अडचणीत येऊ शकता. मात्र, तुम्हाला कामातून थोडा आराम मिळू शकतो. तुम्हाला प्रवास करावा लागू शकतो. व्यवसायाशी संबंधित लोकांना अचानक मोठा फायदा होईल. व्यवसायात विस्तार होईल. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अतिशय शुभ असणार आहे. वृषभ: तुम्हाला तुमची जीवनशैली सुधारण्यासाठी खूप पैसे खर्च करावे लागतील. विचार न करता किंवा घाईत न […]

अधिक वाचा..

छत्रपती संभाजीनगरला मित्राच्या वडिलाचा चाकू भोसकून खून, आरोपीही जखमी…

औरंगाबाद: छ. संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील टाकळी गावात दोन सख्ख्या भावांनी क्षुल्लक कारणावरून तरुणाचा खून केल्याची घटना उघडकीस आली होती, आता पुन्हा पैशाच्या व्यवहाराच्या वादातुन मित्राच्या वडिलांचा भर रस्त्यावरच चाकूने भोसकून खून केल्याचा घटना म्हणजेच शुक्रवारी रात्री 8 वाजेच्या सुमारास टाऊन हॉल परिसरात घडली असून कैलास रामचंद्र वाकेकर (४७, रा. जयभीमनगर, टाऊन हॉल) असे मृताचे […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी

शिक्रापूर (शेरखान शेख): पुणे जिल्ह्यातील चोऱ्यांसह आदी बेकायदेशीर वाहतुकी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी विशेष सूचना दिलेल्या असताना ठिकठिकाणी पोलीस स्टेशनच्या वतीने नाकाबंदी करण्यात येत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आजिनाथ थोरात, पोलीस हवालदार […]

अधिक वाचा..

आपटीतील दारुभट्टी शिक्रापूर पोलिसांकडून उध्वस्त

कच्च्या रसायनांसह एक लाख तीस हजारांचा ऐवज नष्ट शिक्रापूर (शेरखान शेख): आपटी (ता. शिरुर) येथे शिरुर आणि खेड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या नदीच्या कडेला शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने कारवाई करत दारु भट्टी पूर्णपणे उध्वस्त करत तब्बल 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल नष्ट करत दारु भट्टी चालवणाऱ्या जैसपाल नानावत या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहे. आपटी (ता. शिरुर) […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात मुलीच्या गळ्यातील चैन हिसकावली

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथून आपल्या आईसह दुचाकीहून जाणाऱ्या मुलीच्या गळ्यातील सोन्याची चैन दुचाकीहून आलेल्या अज्ञात युवकांनी हिसकावून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे दोन अज्ञात युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पार्लर व्यावसायिक हेमलता सपकाळे हि महिला सायंकाळचे सुमारास त्यांची मुलगी ख़ुशी हिला दुचाकीहून शिक्रापूर येथून […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाढला तापमानाचा आकडा; किती ते पहा….

शिक्रापूर सह परिसरात तापमान चाळीसच्या वर शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या पुणे जिल्हयासह अनेक ठिकाणी पाऊस धुमाकूळ घालत असल्याचे दिसून येत असताना मात्र कमाल तापमानाने चाळीशी ओलांडली असल्याने शिरुर करांची लाहीलाही झाली असून नागरिकांना उष्णतेचा सामना करावा लागला आहे. महाराष्ट्र राज्यात चांगलाच उन्हाळा जाणवू लागलेला असताना कित्येक ठिकाणी पाण्याची पातळी देखील खालावली आहे, काही ठिकाणी पाउस […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातुन तब्बल पाच किलो गांजा जप्त करत कारसह एक जण ताब्यात…

शिक्रापूर पोलिसांची कारवाई शिक्रापूर (शेरखान शेख): निमगाव म्हाळुंगी (ता. शिरुर) येथील न्हावरा रस्त्याचे कडेला गांजा घेऊन आलेल्या कारवर शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली असून सदर कारवाईत पाच किलो गांजासह कार जप्त करत रमेश लक्ष्मण पिंगळे व राहुल दौंडकर या दोघांवर गुन्हे दाखल केले मात्र राहुल दौंडकर हा पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. निमगाव […]

अधिक वाचा..
Anjali Gaikwad

अंजली गायकवाड आत्महत्या प्रकरण अन् पोलिस, पत्रकार आणि खंडणी…

शिरुर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रामलिंग येथील अंजली ज्ञानदेव गायकवाड (वय ३३) या महिलेने सोमवारी (ता. ८) घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पण, आत्महत्येनंतर शिरूर तालुक्यातील नागरिकांमध्ये विविध विषयांवर चर्चा सुरू झाल्या आहेत. आत्महत्येचे खरे कारण काय? याबद्दल माहिती मिळणे राहिले दूर. पण, पोलिस, पत्रकार आणि खंडणीचा विषय पुढे आल्यामुळे नागरिक आजूनच मोठ्या संभ्रमात सापडले […]

अधिक वाचा..

शिंदे – फडणवीस सरकार घटनाबाह्य नैतिकता म्हणून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा…

मुंबई: छत्रपती संभाजीनगर – महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने नुकताच निकाल दिला आहेत. शिंदे फडणवीस सरकार हे घटनाबाह्य रित्या स्थापन झाल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे, त्यामुळे नैतिकता बाळगून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देऊन पदावरून पायउतार व्हावे, अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावर दिली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय महाराष्ट्र, देश,शिवसेना व ज्यांनी […]

अधिक वाचा..

भाजपा लोकशाहीसाठी घातक, सत्तेसाठी कोणत्याही थराला जाते हे पुन्हा सिद्ध: नाना पटोले

मुंबई: महाविकास आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालांची प्रत्येक कृती चुकीची होती यावर सुप्रीम कोर्टाने गंभीर ताशेरे ओढले आहेत. राजभवनचा गैरवापर करुन भाजपाने महाराष्ट्रातील मविआचे सरकार पाडले हे आम्ही सातत्याने सांगत होतो तेच सुप्रीम कोर्टानेही म्हटले आहे. शिंदे-भाजपा सरकार हे असंवैधानिक व बेकायदेशीर आहे हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केले ही त्यांच्यासाठी मोठी चपराक आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर […]

अधिक वाचा..