राज्यातील कारागृहावर राहणार आता ड्रोनची नजर

शिक्रापूर (शेरखान शेख): राज्यातील कारागृहावर आता ड्रोनची नजर ठेवली जाणार असून त्यामुळे कारागृह अंतर्गत सुरक्षितता आणि कैद्यांच्या हालचालीवर बारीक नजर ठेवण्यासाठी मदत होणार आहे. तर पहिल्या टप्प्यात १२ ठिकाणी ड्रोन द्वारे पेट्रोलिंग केले जाणार असल्याची माहिती अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. यावेळी कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे, कारागृह उपमहानिरीक्षक मुख्यालय […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सोंडेआळी येथे एका बंद घरात शंतनू नाना सोंडे या 23 वर्षीय युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सोंडेआळी येथे काही युवक बसलेले असताना त्यांना येथील विठ्ठल सोंडे यांच्या बंद पडलेल्या खोलीमध्ये एका […]

अधिक वाचा..

संजय राठोड यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचार प्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावे

मुंबई: संजय राठोड यांच्या कार्यालयात एवढा मोठा भ्रष्टाचार होत असेल तर हे प्रकरण तात्काळ आर्थिक गुन्हा अन्वेषण विभागाकडे द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांच्या कार्यालयात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राज्याचे केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केला असून त्यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना […]

अधिक वाचा..

विदर्भ वगळता राज्यातील शाळा 15 जून पासून तर विदर्भातील शाळा 30 जून पासून सुरु होणार

मुंबई: विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये आणि त्यांना सुट्यांचे नियोजन करता यावे यासाठी यावर्षीपासून राज्य मंडळाच्या शाळा 15 जून रोजी सुरू होणार असल्याची माहिती, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा 30 जून रोजी सुरू होतील असेही त्यांनी सांगितले. शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत केसरकर […]

अधिक वाचा..

खिदमत फाऊंडेशन भीमरत्न पुरस्कार सन्मानित

शिरुर (अरुणकुमार मोटे): सध्या राज्यात अनेक ठिकाणी दोन समाजामध्ये वादविवाद घडुन दोन्ही समाजामध्ये कटुता निर्माण होत आहे. मात्र याला अपवाद आहे शिरुर शहर… गेल्या अनेक वर्षाचा भाईचारा जपत येथील खिदमत फॉउडेशनने गेल्या 4 वर्षापासुन सर्व समाजाच्या उत्सवात एक होत कोरोना काळापासुन विविध उपक्रम हाती घेतल्याने त्यांना नुकताच भिमरत्न पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले आहे. शिरुर शहरातील […]

अधिक वाचा..

आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच आहोत आणि राष्ट्रवादीतच राहणार आहोत…

मुंबई: माहिती नसताना माझ्याबद्दल किंवा माझ्या सहकारी आमदारांबद्दल गैरसमज निर्माण करण्याचे काम जाणीवपूर्वक वेगवेगळ्या ठिकाणी होताना दिसत आहे. वास्तविक ज्या काही बातम्या दाखवल्या जात आहेत किंवा येत आहेत त्या बातम्यांमध्ये काही तथ्य नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत मांडली.गेले काही दिवस माध्यमातून येत असलेल्या उलटसुलट […]

अधिक वाचा..

शासनाच्या नियोजनशून्य आयोजनामुळेच निष्पाप अनुयायांचा बळी; अजित पवार

मुंबई: खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण सोहळ्याच्यावेळी लाखो संख्येने नागरिक उपस्थित होते. यावेळी अनेकांना उष्माघाताचा त्रास झाला, त्यात निष्पाप १३ अनुयायांचा नाहक बळी गेला. ही दुर्दैवी घटना निसर्गनिर्मित नसून मानव निर्मित आपत्ती आहे. या दुर्दैवी घटनेला सरकारच सर्वस्वी जबाबदार असून या घटनेसाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार […]

अधिक वाचा..

उष्माघात म्हणजे काय, उन्हामुळे मृत्यू का होतो?

औरंगाबाद: आपण सगळेच उन्हात फिरतो. पण काही जणांचाच उन्हात गेल्यामुळे अचानक मृत्यू का होतो? आपल्या शरीराचं तापमान नेहमी ३७ अंश सेल्सियस असतं, या तापमानातच शरीरातले सर्व अवयव नीट काम करू शकतात. घामाच्या रुपाने पाणी बाहेर काढून शरीर ३७ अंश सेल्सियस तापमान कायम राखतं, सतत घाम निघत असताना पाणी पीत राहाणं अत्यंत गरजेचं आणि अत्यावश्यक आहे. […]

अधिक वाचा..

राज्यातून एन.ए. टॅक्स पूर्णपणे हटवणार…

महसूलमंत्री विखे पाटलांची छ. संभाजीनगरात मोठी घोषणा… औरंगाबाद: महाराष्ट्र राज्यातून लवकरच एन. ए. टॅक्स (अकृषी कर) हटविण्याचा मोठा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. त्यामुळे खरेदीच्या वेळीच एकदाच ‘एनए’ भरावा (वन टाइम टॅक्स) लागणार आहे. तर एकदा एन. ए. टॅक्स भरल्यावर नंतर भरण्याची गरज राहणार नसल्याची घोषणा राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. या […]

अधिक वाचा..

हिंदू मुस्लीम ऐक्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन;  प्रमोद क्षिरसागर

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर परिसरातील हिंदू मुस्लीम बांधव एकोप्याने राहून सर्व सन उत्सव साजरे करत असल्याची बाब कौतुकास्पद असून हिंदू मुस्लीम ऐक्यातून भारतीय संस्कृतीचे दर्शन होत असल्याचे मत शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षिरसागर यांनी व्यक्त केला आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील जामा मस्जिदमध्ये मुस्लीम बांधवाच्या पवित्र अशा रमजान महिन्यातील रोजे निमित्त शिक्रापूर पोलीस […]

अधिक वाचा..