पोलीस भरती मध्ये विचारले जाणारे प्रश्न व त्यांची उत्तरे…

1) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे? उत्तर : शेती 2) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : महाराष्ट्र 3) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते? उत्तर : महाराष्ट्र 4) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? उत्तर : वित्त सचिव 5) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते? उत्तर : रिझर्व बँकेचे गव्हर्नर 6) […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत महिलेच्या घरातून दागिने व रक्कम चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील एका महिलेच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कान्हूर डमेसाई (ता. शिरुर) येथील पुंडे मळा येथे राहणाऱ्या सुरेखा पुंडे या 4 ऑक्टोबर रोजी घराला कुलूप लावून […]

अधिक वाचा..
Crime

करंदीत व्यक्तीच्या घरातून दागिने व रक्कम चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी घरातील चांदीचे दागिने व रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. करंदी (ता. शिरुर) येथील कांतीलाल मुरकुटे हे 1 ऑक्टोबर रोजी त्यांच्या घराला कुलूप लावून त्यांच्या पुणे येथील घरी गेलेले […]

अधिक वाचा..

युवतींनी सायबर गुन्ह्यापासून सावध रहावे; ज्योती आहेरकर

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्याची पिढी मोबाईलच्या आहारी चाललेली असताना मोबाईल मध्ये नवनवीन ॲप युवक वर्ग वापरत असून त्यातून असंख्य सायबर गुन्हे घडत असताना त्यामध्ये अनेक युवती देखील सायबर गुन्ह्याचे बळी ठरत आहेत. मात्र आहेत. मात्र युवतींनी सायबर गुन्ह्यापासून सावध रहावे, असे आवाहन पोलीस नाईक ज्योती आहेरकर यांनी केले आहे. वढू बुद्रुक (ता. शिरुर) येथील शरदचंद्रजी […]

अधिक वाचा..

वन्यजीव हि आपल्या देशाची संपत्ती; शेरखान शेख

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): प्रत्येक वन्यजीव हे आपल्या देशाची संपत्ती असून आपल्या भागातून कमी होत चाललेले वन्यजीवांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम प्रशाला येथे शिरुर वनविभागाच्या माध्यमातून वनपाल ऋषिकेश लाड वनरक्षक व गणेश पवार यांच्या […]

अधिक वाचा..

नाशिक औरंगाबाद मार्गावर एका खासगी बसच्या अपघात 11 जणांचा होरपळून मृत्यू…

नाशिक: नाशिक ते औरंगाबाद मार्गावर एका खासगी बस आणि टेम्पोची धडक होऊन भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसला आग लागून त्यात 11 जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 38 लोक गंभीर जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. पहाटे पावणे पाचच्या सुमारास ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. चिंतामणी […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये मोबाईल चोरी प्रकरणी एस टी च्या चालक आणि वाहका विरोधात तक्रार

शिरुर (तेजस फडके) शिरुर आगारात पुणे-औरंगाबाद हि एस टी थांबलेली असताना या गाडीतून प्रवास करणारा प्रवासी ATM मधुन पैसे काढण्यासाठी खाली उतरला. त्यावेळी त्याने आपला मोबाईल आणि पॉवर बँक शेजारीच असणाऱ्या एका मोबाईलच्या दुकानात चार्जिंगला लावली. परंतु तो प्रवासी परत आल्यावर पुणे-औरंगाबाद एस टी निघुन गेल्याचे त्याच्या लक्षात आले. तसेच सदर एस टी चालक आणि […]

अधिक वाचा..

पुणे-नगर महामार्गावरील होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी संयुक्त बैठक लावा; नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पुणे-अहमदनगर हा राज्यातील महत्त्वाचा महामार्ग असुन या रोडलगतच कोरेगाव भीमा, सणसवाडी ,शिक्रापूर MIDC , रांजणगाव MIDC ,सुपा MIDC या औद्योगिक वसाहतीमुळे अवजड वाहने तसेच लहान वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते. तसेच पुणे-अहमदनगर महामार्गावर अनेक ठिकाणी स्थानिक ग्रामस्थ आणि कारखानदार यांनी बेकायदेशीर डिव्हायडर तोडल्याने वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होत आहे. तसेच […]

अधिक वाचा..

बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन भावाने प्रियकराला पाठवले यमसदनी…

औरंगाबाद: कन्नड तालुक्यात असलेल्या टापरगावात एका धक्कादायक घटना घडली असून, सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरुन मुलीच्या भावाने एका तरुणाला यमसदनी पाठवल्याचे निष्पन्न झाले असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तर विशाल रमेश लव्हाळे (टापरगाव, ता. कन्नड) असे मृत तरुणाचे नाव आहे. तर कृष्णा दिगंबर पवार (चिंचोली, ता. खुलताबाद) असे मुख्य आरोपीचे […]

अधिक वाचा..

दसऱ्याच्या मुहर्तावर कापसाला पहिल्याच दिवशी मिळाला एवढा भाव…

सिल्लोड: बनकिन्होळा परिसरात दसऱ्याच्या मुहर्तावर कापूस खरेदीला व्यापाऱ्यांकडून प्रारंभ करण्यात आला. व्यापारी संतोष फरकाडे व दत्ता काकडे यांनी विजयादशमीच्या मुहूर्तावर ११,००० रुपये प्रति क्विंटल दराने कापसाची खरेदी केल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. सिल्लोड प्रमाणेच पैठण तालुक्यातील टाकळी अंबड व परिसरात विविध ठिकाणी दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर कापूस खरेदीस प्रारंभ करण्यात आला. दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर टाकळी अंबड […]

अधिक वाचा..