शिरूर (अरुणकुमार मोटे): गणपती मंडळाच्या वर्गणीसाठी दादागीरीने दुकानात घुसून खंडणी वसूलप्रकरणी खंडणीसह, विनयभंग, हाणामारीचा शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिरूर शहरातील पाबळफाटा येथील गणपती मंडळासाठी वर्गणीची मागेल ती रक्कम दिली नाही म्हणून चक्क कायदा हातात घेऊन एका दुकानदार महिलेला तिच्या दुकानात घुसून खंडणी, मारहाण व विनयभंग केला. भांडणे सोडवायला आलेल्या तरुणावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने डोके फुटेपर्यंत मारहाण दुखापत करून इतरांनाही जबर मारहाण करण्यात आली. या प्रकरणी शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
शिरूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिरुर शहरातील पाबळ फाटा येथे महागणपती इलेक्ट्रीक दुकान आहे. फिर्यादी महिला दुकान चालवुन कुटूंबाची उपजिविका करते. सदर महिला दुकानात असताना तिच्या दुकानात १) अतुल गव्हाणे, २) अजय प्रकाश गव्हाणे, ३) विकी जाधव, ४) कैलास पवार, ५) अविनाश मोरे, ६) अतुल गिरे, ७) शुभम गव्हाणे, ८) भाऊसाहेब जाधव व इतर ७ ते ८ लोक (पूर्ण नाव माहीत नाही) असे दुकाना समोर आले. व त्यांनी ‘या महिलेला “गणपतीचे वर्गणी दया” असे म्हणाल्याने महिलेने त्यांना १०१/- रू वर्गनी करा, असे म्हणाल्या. त्यातील अतुल गव्हाणे याने मला “तुम्हाला पाबळ फाटयावर धंदा कारायचा असेल तर ११०० रुपयांची वर्गणी करावी लागेन नाहीतर तुम्हाला पाबळ फाट्यावर धंदा करू देणार नाही “आम्हाला ११०० रूपये च वर्गणी पाहीजे. त्याचे खाली एक रुपया घेणार नाही, असे बोलून महिलेकडे खंडणी नाही दिली तर जिवे मारून टाकीन अशी धमकी दिली. शिवाय, शिवीगाळ दमदाटी करू लागले. महिलेने आम्ही एवढी वर्गनी देवू शकत नाही. माझी १०१ रुपये वर्गनी करा असे म्हणाले असता वरील सर्वजन जबरदस्तीने महिलेचे दुकानात घुसुन अंगावर धावून आले व विकी जाधव याने विनयभंग केला.

शेजारील दुकाना समोर उभे असलेला महिलेचा भाऊ, भाचे महिलेला सोडविण्यासाठी मध्ये पडून त्यांना भांडण करू नका, असे म्हणून समजावू लागले. वरील सर्वांनी त्यांना हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. शिवाय, वेल्डींगचे दुकानातील पडलेला लोखंडी रॉड हातात घेवून डोक्यात मारला त्यानंतर तेथे अतुल गव्हाणे याची आई (नाव माहीत नाही) आली तिने फिर्यादीला हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. त्यावेळी झटापटीत फिर्यादिचे हातातील अतुल गव्हाणे याने 5 ग्रॅमची अंगठी जबरदस्तीने काढूने घेतली आहे. त्यानंतर शुध्द आल्यानंतर शिरूर पोलिस स्टेशनला सदर प्रकरणी तक्रार देण्यात आली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक एकनाथ पाटील हे करत आहे.
घडलेली ही घटना अतिशय गंभीर आणि निंदनीय स्वरूपाची आहे. ज्यांच्यावर हल्ला झाला ती महिला एक व्यावसायिक असून अजूनही या धक्क्यातून सावरलेली नाही. काही एक चुक नसतानाही, या वसुली बहाद्दरांना मागेल ती रक्कम दिली नाही म्हणून काही समजण्याच्या आतच नागरीकांवर हल्ला होतो हे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आणी समाजघातकी कृत्य आहे, असे सामाजिक कार्यकर्ता निलेश वाळूंज यांनी सांगितले.