शिक्षक-कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; e-KYC साठी २० सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदतवाढ

पुणे : राज्यभरातील खाजगी शाळांमधील अनुदानित, अंशतः अनुदानित तसेच जिल्हा परिषदांच्या प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शालार्थ प्रणालीमध्ये कर्मचाऱ्यांचे e-KYC पूर्ण करण्यासाठी २० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालयाने याबाबत परिपत्रक जारी केले आहे. यापूर्वी ऑगस्ट २०२६ पर्यंत e-KYC पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. […]

अधिक वाचा..

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे ‘नशामुक्त मुंबई’ अभियानाची सुरुवात 30 जुलै रोजी वरळी डोम येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हे अभियान केवळ उद्घाटनापुरते मर्यादित नसून, वर्षभर चालणारी व्यापक जनजागृती मोहीम असेल, अशी माहिती कौशल्य विकास मंत्री तथा मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली. अभियानाच्या पूर्वतयारीसंदर्भातील आढावा बैठकीत […]

अधिक वाचा..

शिक्षकांच्या सूचनांवरच घडणार शिक्षणातील बदल; ‘शिक्षण संवाद २०२६’मध्ये शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची ग्वाही

मुंबई : राज्यातील शिक्षण व्यवस्था अधिक गुणवत्तापूर्ण, विद्यार्थीकेंद्रित आणि परिणामकारक करण्यासाठी शिक्षकांच्या प्रत्यक्ष अनुभवांना व सूचनांना सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, अशी ग्वाही शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी दिली. शालेय शिक्षण विभागातर्फे चर्नी रोड येथील महाराष्ट्र राज्य जवाहर बालभवनमध्ये आयोजित ‘शिक्षण संवाद २०२६’ या विचारमंथन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी शिक्षण आयुक्त सच्छिंद्रप्रताप सिंह, जवाहर बालभवनच्या […]

अधिक वाचा..

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित शालार्थ आयडी घोटाळ्यात अटक करण्यात आलेल्या संशयित प्रशांत वाडिले याच्या चौकशीतून धक्कादायक माहिती समोर येत आहे. शासनाच्या तिजोरीला तब्बल 160 कोटी रुपयांचा फटका बसविणाऱ्या या घोटाळ्याची मोडस ऑपरेंडी आर्थिक गुन्हे शाखेने उघडकीस आणली असून, बनावट […]

अधिक वाचा..

मुख्याध्यापकांसह शिक्षकांसाठीही ‘टीईटी’ बंधनकारक

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर शिक्षण विभागाची स्पष्टता सोलापूर: इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवर अध्यापन करणाऱ्या शिक्षकांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. मात्र, हा निर्णय केवळ शिक्षकांसाठी असून मुख्याध्यापकांना लागू नाही, असा संभ्रम निर्माण झाला होता. यावर आता माध्यमिक शिक्षण विभागाने स्पष्ट भूमिका मांडत मुख्याध्यापकांनाही ‘टीईटी’ची अट लागू असल्याचे […]

अधिक वाचा..

विद्यार्थ्यांचा कान किंवा केस ओढला तरी शिक्षकांची नोकरी धोक्यात

शिक्षण विभागाचे कडक ‘डूज-अँड-डोन्ट्स’ जाहीर औरंगाबाद: शिक्षण विभागाने शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी कडक डूज-अँड-डोन्ट्स लागू केले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत शाळांमध्ये शिस्तबद्ध, नैतिक आणि सुरक्षित वातावरण राखणे बंधनकारक करण्यात आले आहे. तक्रार आल्यास तात्काळ कारवाई अनिवार्य विद्यार्थ्यांशी संबंधित गंभीर घटना वृत्तपत्र, टीव्ही किंवा सोशल मीडियातून समोर आली तरी शिक्षणाधिकारी व गटशिक्षणाधिकारी यांनी स्वतःहून […]

अधिक वाचा..

मालवणी टाऊनशिप शाळेत खाजगी संस्थेद्वारे अपात्र शिक्षकांची भरती; आमदार अस्लम शेख

पालिकेच्या शाळेत टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ! आमदार अस्लम शेख नागपूर: मालाड पश्चिम मधील ‘मुंबई पब्लिक स्कूल’च्या’ ‘मालवणी टाऊनशिप शाळेत’ खाजगी संस्थेमार्फत अपात्र शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळखंडोबा सुरु आहे, असा गंभीर आरोप मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केला. शेख पुढे म्हणाले की, पालिकेच्या मालवणी टाऊनशिप शाळेत पहिली […]

अधिक वाचा..

राज्यात १८,००० कंत्राटी शिक्षकांची भरती होणार

औरंगाबाद: राज्यातील शिक्षण व्यवस्थेत मोठा बदल होणार असून सुमारे १८ हजार १०६ कमी पटाच्या शाळांमध्ये कंत्राटी शिक्षक नेमण्याची मोठी प्रक्रिया सुरू होणार आहे जिल्हा परिषदेच्या कमी पटाच्या शाळांवर याचा थेट परिणाम होणार आहे सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा आदेश ५२ वर्षे वयापर्यंतच्या प्राथमिक शिक्षकांनी दोन वर्षांत TET उत्तीर्ण करणे आवश्यक २३ नोव्हेंबरला झालेली TET ही पहिली संधी […]

अधिक वाचा..

पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी ॲड. युवराज थोरात यांची निवड

शिरूर (अरुणकुमार मोटे): पुणे जिल्हा पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख संघटनेचे त्रैवार्षिक अधिवेशन व जिल्हा मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला. या अधिवेशनाला राज्यभरातून तसेच जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून शिक्षक बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमात राज्याध्यक्ष अनिलजी पलांडे यांनी शिक्षक संघटनेसमोरील विविध प्रश्न सोडवण्यासाठी व संघटनेची वाढ घडवून आणण्यासाठी मार्गदर्शन केले. तसेच राज्य सरचिटणीस मनोज […]

अधिक वाचा..

पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर; उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई: विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश देण्याचे काम शिक्षक करतात. त्यामुळे शिक्षकांचा सन्मान हा राष्ट्रनिर्मितीचा सन्मान आहे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते न शिकवता, कौशल्याधारित शिक्षण, समस्यांचे निराकरण, टीमवर्क आणि मूल्याधारित शिक्षण, ज्ञानासोबत सद्गुणांची शिकवणूक देऊन स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये विश्वास निर्माण होईल अशी सशक्त पिढी घडवावी. पुरस्कार प्राप्त शिक्षक हे राज्याचे ब्रँड ॲम्बेसेडर आहेत, असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री […]

अधिक वाचा..