sharad pawar dilip walse patil

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

शिरूर (तेजस फडके) शिरूर-आंबेगाव मतदार संघातून सात वेळा निवडून आलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शिरूर तालुक्यात नाराजीचा सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. शिवाय, रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट करत तुम्हाला काय केलं होतं कमी? का पत्करली गुलामी? असा प्रश्न विचारून […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील यांच्या मक्तेदारीला मतदार संघातूनच आव्हान…

शिरूरः शिरूर-आंबेगाव मतदार संघातून सात वेळा निवडून आलेले दिलीप वळसे पाटील यांच्या विरुद्ध त्यांचेच एक कार्यकर्ते देवदत्त निकम यांनी शरद पवार यांना आपला पाठिंबा दर्शवीत वळसे-पाटील यांच्या तालुक्यातील मक्तेदारीला आव्हान देत शरद पवार यांना पाठिंबा दिला आहे. देवदत्त निकम यांनी राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांना आपला पाठिंबा जाहीर केला. त्यामुळे तालुक्यातील अनेक नागरिकांचा अप्रत्यक्ष […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…

मुंबईः अजित पवार यांनी रविवारी (ता. २) सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा कसा काय दिला हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे. […]

अधिक वाचा..
amol kolhe

अजित पवार यांना धक्का! डॉ. अमोल कोल्हे यांचे ट्विट आले चर्चेत…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेले असून, रविवारी (ता. २) राजभवनात 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांच्यात फूट पडली आहे. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांचे ‘मी साहेबांसोबतच’ हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. राजभवनात रविवारी (ता. […]

अधिक वाचा..
sharad pawar

शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात…

कराड (सातारा): अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक तीर्थक्षेत्र असलेल्या प्रितीसंगमावर जाऊन पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. पहिली सभा अजित पवारांसोबत जाऊन धक्का दिलेल्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला मुंडे यांच्या मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे. कोणताही संभ्रम नको, जाहीरपणे […]

अधिक वाचा..
ajit pawar oath

शिरूरकरांची प्रतिक्रिया! आयुष्यभर संघर्ष केला त्यांच्यासोबत आज बसण्याची वेळ आली…

राजकीय घडामोडीबाबत शिरूरकरांची ‘वेट अँड वॉच’ची भूमिका… शिरूर (अरुणकुमार मोटे): महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात अचानक नाटयमय घडामोडी घडल्यानंतर शिरूर शहरात त्याचे पडसाद उमटले आहे. दिवसभर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा सुरू होत्या. मात्र, पदाधिकाऱ्यांनी प्रतिक्रियांना नकार देत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका घेत आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार अशोक पवार हेदेखील अजित पवार यांच्या सोबत आहेत का? अशी चर्चा रंगू […]

अधिक वाचा..

एकनाथ शिंदेंसह १६ आमदार अपात्र होणार असल्यामुळेच भाजपाकडून सत्तेच्या खुर्चीचा खेळ?

मुंबई: महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे. जनसमर्थन घटत असल्याने सत्तेसाठी काहीही करण्याचा हा भाजपाचा विकृत पॅटर्न आहे. महाराष्ट्राची जनता हा सत्तेचा खेळ उघड्या डोळ्यांनी पहात असून लोकशाही व संविधान धाब्यावर बसवून खुर्चीचा खेळ सुरु आहे. महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण सुरु असून सत्तापिपासू भारतीय जनता पक्षाचे […]

अधिक वाचा..

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये मुंबई व महाराष्ट्रात महिला असुरक्षित…

मुंबई: राज्यातील राजकीय परिस्थिती, कायदा व सुव्यवस्था तसेच शेतकऱ्यांच्या समस्यांवर काँग्रेस कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चा झाली. पाऊस उशिरा पडल्याने दुबार पेरणीचे संकट असून शेतकऱ्याला खते, बियाणे मोफत द्यावे यासाठी सरकारकडे पाठपुरावा करु आणि वेळपडली तर राज्यपालांकडे जाऊ. पावसामुळे मंबईत सहा लोकांचा हकनाक बळी गेला, मुंबईत जागोजागी पाणी साचून मुंबईकरांची प्रचंड झाले आहे त्यामुळे खर्च केलेले […]

अधिक वाचा..

स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

राष्ट्रपित्याचा अपमान करणारी ‘गोडसेची औलाद’ सदारवर्तेवर कारवाई कधी करणार ? मुंबई: मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी घरावर तुळशीपत्र ठेवून सर्वस्व अर्पण केले. बेताल विधान करून […]

अधिक वाचा..

महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव; नाना पटोले

मुंबई: महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात आहे. सत्तेच्या जोरावर महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भारतीय जनता पक्षाचा कुटील डाव आहे, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. यासंदर्भात पत्रकारांशी […]

अधिक वाचा..