अयोध्या पोळ यांच्यावरील हल्ल्याबाबत चौकशी करून दोषींवर कारवाई करावी

मुंबई: कळवा भागात (दि. १६) रोजी एका कार्यक्रमात शिवसेनेच्या पदाधिकारी अयोध्या पोळ यांच्यावर काही लोकांनी हल्ला केला. या घटनेची शिवसेना उपनेत्या व विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी गंभीर दखल घेतली आहे. याबाबत त्यांनी दूरध्वनीवरून माहिती घेऊन संवाद साधला आणि त्यांना दिलासा दिला. या घटनेमध्ये दोषी असणाऱ्या व्यक्तींवर त्वरीत कारवाई करण्याबाबत त्यांनी स्थानिक पोलिसांकडे […]

अधिक वाचा..

शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी लोकप्रतिनिधींनी सामाजिक जाणीव ठेवून प्रकर्षाने पुढे यावे

मुंबई: जगभरात सर्वच देशांनी मान्य केलेली शाश्वत विकास उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी विविध देशातील शासनकर्ते आणि विविध लोकांचे प्रयत्न सुरू आहेत. भारतातही अनेक पातळ्यांवर यामध्ये काम करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. विशेषतः पर्यावरण, टेकड्यांच्या नाशाकडे जात असलेली विकास प्रक्रिया, नद्यांचे पुनरुज्जीवन, जलव्यवस्थापन अशा विषयांवर भारतात काम सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामध्ये राज्य सरकारच्या पातळीवर काम […]

अधिक वाचा..

हुतात्मा स्मारकावर टपाल तिकीट प्रकाशित करण्यासाठी पुढाकार घ्या…

मुंबई: महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये अजरामर ठरलेल्या आणि महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेसाठी हुतात्मा झालेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मारक मुंबईमध्ये १९६१ पासून आहे. फाउंटन येथे दिमाखात उभ्या असलेल्या या स्मारकाच्या रूपाने हा सर्व लढा इतिहासाची कायमस्वरूपी प्रेरणा देत आहे. या हुतात्म्यांच्या स्मारकाच्या सन्मानार्थ टपाल तिकीट प्रकाशित करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महादेव गोविंद उर्फ भाऊ सावंत यांनी केलेली आहे. सन […]

अधिक वाचा..

नागरिकांना न्याय देण्याच्या दृष्टीने संसदीय आयुधांचा योग्य वापर करावा

मुंबई: नागरिकांच्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने लोकप्रतिनिधींनी अधिवेशनात विविध संसदीय आयुधांचा वापर करावा. जेणेकरून नागरिकांना न्याय देण्यास सहकार्य लाभेल आणि समाजकारण व राजकारणास वळण देता येईल, असे प्रतिपादन उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी केले. आज विधीमंडळात विविध संसदीय आयुधे, समिती पद्‌धत, विधेयके या विषयांवर विधानपरिषद सदस्यांसाठी कृतीसत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे […]

अधिक वाचा..

महाराष्ट्रात ठिकठिकाणी राज्याच्या हिताच्या अनेक विषयांना चालना देण्यासाठी राज्यपाल पुढाकार घेणार

मुंबई: राज्यात येणाऱ्या विदेशी महिला पर्यटकांच्या सुरक्षेच्या मुद्द्यांवर केंद्र आणि राज्य सरकारने मिळून काही मार्गदर्शक सूचना (एसओपी) तयार केल्या आहेत का, आणि त्याचे पालन योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही याबाबत योग्य ती कार्यवाही व्हावी. विधीमंडळाच्या अधिवेशनाच्या कामकाजाची चर्चा करताना झालेले विविध विषय आणि अनेक पातळ्यांवर मिळालेल्या चांगले सहकार्य मिळाल्याचे नमूद केले. विशेषत: राज्यातील तीर्थक्षेत्र […]

अधिक वाचा..

मुंबई विद्यापीठाने हंगामी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाबाबत तोडगा काढावा…

मुंबई: मुंबई विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या हंगामी कर्मचाऱ्यांना नियमीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांप्रमाणे सोईसुविधा मिळणे गरजेचे आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाने हंगामी कर्मचाऱ्यांच्या सेवेबाबत सिनेट समिती सदस्य आणि कर्मचारी संघटना यांच्या समावेत चर्चा करून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी पुढकार घ्यावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले. आज विधानभवन येथील मा. उपसभापती यांच्या दालनात मुंबई विद्यापीठाच्या कंत्राटी कर्मचारी […]

अधिक वाचा..

प्रतिनिधीनींनी अचूक आणि निर्दोष सेवा कशी देता येईल यासंदर्भात व्यापक भूमिका घ्यावी…

मुंबई: मुंबई महानगरपालिकेतील घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत सॅनिटरी नॅपकिन मशीन बसविण्यासाठी काढलेल्या निविदेच्या घोटाळ्यासंदर्भात येत्या वीस मार्च रोजी बैठक बोलवावी. या बैठकीला विरोधी पक्षाच्या आमदारांना देखील बोलवण्यात यावे. अचूक आणि निर्दोष सेवा कशी देता येईल यासंदर्भात व्यापक भूमिका आपण घेतली पाहिजे, असे निर्देश उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत दिले. आज लक्षवेधी प्रश्नाअंतर्गत आमदार मा. […]

अधिक वाचा..

प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे…

मुंबई: राज्याचे चौथे महिला धोरण २०२३ ची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात महिला ‘महिला विकास व्यासपीठ’ असावे, महिला व बालविकास विभागाला वाढीव निधी मिळावा, मनोधैर्य योजना महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्याच्याबाबत आम्ही सर्व महिला आमदार मागणी करत आहोत, असे प्रतिपादन उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी महिला बालविकास विभागातर्फे आयोजित महिला धोरणाच्या चर्चेच्या बैठकीत केले. राज्याचे […]

अधिक वाचा..

नवी मुंबई, नाशिक जिल्ह्यातील अवैध उत्खननावर तात्काळ बैठकीचे आयोजन करा

मुंबई: नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत, सह्याद्री पर्वत आणि मुंबईत सुरू असलेल्या अवैध उत्खनन रोखण्यासाठीच्या उपाय योजनांसंदर्भात तात्काळ बैठकीचे आयोजन करण्याच्या सूचना आज विधान परिषदेमध्ये उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या. राज्यात मोठ्या प्रमाणात अवैध उत्खनन होत आहे. नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वत आणि सह्याद्री पर्वतात अवैध उत्खनन रोखण्यासाठी उपाय योजना करण्याबाबत आ. सुनील शिंदे, आ. विलास […]

अधिक वाचा..

विमा कंपन्यांशी बोलून लवकर भरपाई देता येईल का?

विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची कृषिमंत्री मा. अब्दुल सत्तार यांना सूचना मुंबई: शेतकरी अपघाती विमा अंतर्गत विमा कंपनीकडून मिळणारी भरपाईसाठी जवळपास सात वर्षे थांबायला लागते. त्याकरता विमा कंपनी आणि गृहविभागाशी बोलून लवकरात लवकर विम्याचा मोबदला देता येईल का यासाठी प्रयत्न करण्याची सूचना विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांना केली. […]

अधिक वाचा..