महिलांना सन्मान, योग्य संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करावा; सुनेत्रा पवार 

मुंबई: मुंबई महानगर क्षेत्रातील शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी “कम अर्ली-गो अर्ली” सवलत देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज विधान परिषदेत केली. दरम्यान महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासन कटीबध्द असल्याची ग्वाही देत राज्यातील महिलांना योग्य सन्मान, संधी आणि सुरक्षितता देणारा समाज घडवण्याचा संकल्प अधिक दृढ करण्याचे आवाहनही सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी केले.आंतरराष्ट्रीय महिला […]

अधिक वाचा..

महिला व मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न : अकोला आणि मध्यप्रदेशातील धक्कादायक घटनांनी समाज हादरला

अकोला: महिला व मुलींच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अकोला आणि मध्यप्रदेशातील दोन वेगवेगळ्या, मात्र तितक्याच धक्कादायक घटनांनी संपूर्ण समाज हादरून गेला आहे. विश्वासाचा गैरवापर, ब्लॅकमेलिंग, लैंगिक अत्याचार आणि सुरक्षेतील हलगर्जीपणा यामुळे निष्पाप महिला व मुलींना किती मोठी किंमत मोजावी लागते, हे या घटनांतून स्पष्ट झाले आहे. अकोल्यात महिलेला ब्लॅकमेल करून अत्याचार, धर्मांतराचा […]

अधिक वाचा..

कायदे असूनही बालक असुरक्षितच! बालकांच्या सुरक्षेसाठी समाज कधी जागा होणार?

बदलापूर: बदलापूर येथे घडलेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण समाज हादरून गेला आहे. अशा घटना केवळ कायद्याने थांबत नाहीत, तर त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाची जागरूकता तितकीच महत्त्वाची आहे. सरकार कितीही कठोर कायदे आणि नियम तयार करीत असले, तरी त्यांची अंमलबजावणी होत नसेल तर ते कागदावरच राहतात, ही दुर्दैवी वस्तुस्थिती पुन्हा एकदा समोर आली आहे. बालकांवरील लैंगिक […]

अधिक वाचा..

राजकारणापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा

77 व्या प्रजासत्ताक दिनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन ठाणे: सत्तासंघर्ष आणि राजकारणापेक्षा देश, राज्य आणि समाज मोठा असतो. धर्माच्या पलीकडे जाऊन कोणावरही अन्याय न होऊ देता सर्व समाजघटकांना सोबत घेऊन कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती करणे हेच आपले ध्येय असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. 77 व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त ठाणे पोलीस […]

अधिक वाचा..

दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळामार्फत ‘पोटरा’ चित्रपटाचे विशेष प्रदर्शन

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात गाजलेल्या चित्रपटाचा मुंबईत पहिल्यांदाच रसास्वाद मुंबई: आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये आपली वेगळी आणि ठसठशीत छाप उमटवणाऱ्या ‘पोटरा’ या मराठी चित्रपटाचे मुंबईत पहिल्यांदाच विशेष प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन २४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या लघुनाट्यगृहात होणार आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने […]

अधिक वाचा..

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित; त्यांच्या कुटुंबांसाठी समाजाने ठोस पावले उचलावीत

वाल्हे: देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या प्रत्येक सैनिकामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून समाजाने सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी ठोस केले पाहिजे, असे भावनिक प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा योगेश चिथडे यांनी केले. वाल्हे येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी आयोजित यशोगाथा व प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन […]

अधिक वाचा..

महिला सुरक्षित तर समाज सक्षम, सुरक्षेशिवाय प्रतिष्ठा आणि प्रगती दोन्ही अशक्य

नागपूर येथील राज्य महिला आयोगाच्या ‘सक्षमा’ कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला महिलांच्या सुरक्षेचा व्यापक दृष्टिकोन नागपूर: “समाजाची प्रतिष्ठा महिलांच्या सुरक्षेवर अवलंबून असते. समाजात महिला-मुली सुरक्षित नसतील तर तो समाज प्रगती करू शकत नाही,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. गेल्या साडेतीन वर्षांच्या कालावधीत महिलांसाठी महायुती सरकारने अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

समाजातील वंचितांना “शैक्षणिक साहित्य” वितरण करून साजरा करणार विजयादशमी

मुंबई: (धम्मचक्र प्रवर्तन दिन) आता फक्त ऐतिहासिक स्मरणापुरता न राहता, तो सामाजिक बांधिलकीचा दिवस ठरवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, कपडे आणि मिठाई वाटून हा दिवस साजरा करण्याचे आवाहन ‘एक वही एक पेन अभियान’च्या वतीने करण्यात आले आहे. १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात लाखो अनुयायांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. या […]

अधिक वाचा..

मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजाची एकजूट ही काळाची गरज; उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

राज्य महिला आयोगामार्फत संवेदनशीलता ते संकल्प;  शोषणाविरोधात लढा कृतीशाळेचे आयोजन मुंबई: “मानवी तस्करीविरोधातील लढ्यासाठी समाजातील सर्व घटकांनी कृतीशील सहभाग घ्यावा, ही केवळ भावना नाही तर काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले. महिलांच्या सुरक्षिततेसाठी राज्य शासन सातत्याने प्रयत्नशील असून, मानवी तस्करीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक यंत्रणा, पोलीस, स्वयंसेवी संस्था […]

अधिक वाचा..

अहिल्याबाईंच्या विचारांप्रमाणे समाजासाठी न्यायदायी कार्य करण्याचा निर्धार; नीलम गोऱ्हे 

चौंडी: विधान परिषद उपसभापती तथा शिवसेना नेत्या मा. डॉ. नीलम ताई गोऱ्हे यांनी दिनांक १५ मे रोजी सकाळी ११:३० वाजता चौंडी (ता. कर्जत, जि. अहिल्यानगर) येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन केले. या प्रसंगी बोलताना डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, “चौंडी येथील हे भव्य स्मारक ग्रामस्थ व शासनाच्या संयुक्त प्रयत्नातून उभारण्यात आले असून, अहिल्याबाईंचं […]

अधिक वाचा..